उद्योग असो वा नोकरी काम करताना चुका होताच राहतात; पण अशा चुकांमधूनच धडा घेऊन यशाच्या शिखराकडे जाता येते. विश्वास वाडे यांनी या पुस्तकात एखाद दुसऱ्या नव्हे, तर तब्बल १४० चुका सांगितल्या आहेत. व्यवसाय तर करायचाय, पण नियोजनच नसेल, तर कष्टावर पाणी फिरायला वेळ लागत नाही, किंवा स्वतःच्या क्षमता-कमतरतांची माहिती नसेल, नव्या कल्पनांची वानवा असेल, तर अपयश हे ठरलेलेच.
योग्य वेळी निर्णय घेतला नाही, तर त्याचे परिणाम भोगावे लागतात. पुस्तकाच्या पहिल्या भागात या आणि अशा चुकांची माहिती दिली आहे. दुसरा भाग संधी, वेळ, मानसिक आरोग्य आदींचा आढावा घेतो, तर तिसऱ्या भागात बिझनेस नेट्वर्किंग, व्यवसाय बदल, विचारांची कक्षा रुंदावण्याची गरज सांगितली आहे.
प्रकाशक : संधिकाल प्रकाशन
पाने : ४०४
किंमत : ६५० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)